भद्रावती तालुक्यातील मांगली (रै.)येथील जगन्नाथ बाबा मंदिर परिसरात शेत शिवारात वीज पडून ५ जनावरांचा जागीच मृत्यू झालेला आहे. या आकस्मिक घटनेत तीन शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सदर घटना २८ मे २०२३ रोजी रविवारला सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास घडली. मांगली येथील रहिवाशी नानाजी उगे, विठ्ठल उगे, आणि शरद सातपुते यांच्या मालकीचे जनावरे आज भद्रावती चंदनखेडा मार्गा लागत असलेल्या जगन्नाथ बाबा मंदिर परिसरात शेत शिवारात चरत होती.
अचानक विजेचा कडकडाट व जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. यावेळी वीज पडून मंदिर परिसरात पाच जनावरे दगावली . यामध्ये नानाजी उगे यांच्या मालकीचा एक बैल व एक कालवड , विठ्ठल उगे यांच्या मालकीचे दोन कालवड आणि शरद सातपुते यांच्या मालकीचा एक बैल मृत्यूमुखी पडला आहे . ऐन शेतीच्या हंगामाच्या सुरुवातीलाच जनावर दगावल्याने या तीनही शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शासनाने यासंबंधी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना उचित आर्थिक भरपाई द्यावी, अशी मागणी परिसरात केली जात आहे.
.






