पूर्ण सवलत विनामूल्य तिकीट मुळे नागरिक करतात विनाकारण रोज प्रवास
वरोरा :- महाराष्ट्र शासनाच्या ७५ वरील नागरिकांना एस. टी. च्या बस मधुन मोफत प्रवास व महिलांना अर्ध सवलतीच्या दरात प्रवास ही योजना जेवळी प्रभावशाली ठरत आहे तेवळीचं डोके दुःखी पण ठरत आहे. या मुळे महिलांना प्रवासात सूट मिळत असली तरी याचा काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात गैरवापर सुद्धा होत असल्याचे दिसून येत आहे. या सवलतीच्या दरामुळे ग्रामीण भागातील महिला व वृद्धाची एस. टी. च्या बस मध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे चित्र दिसत आहे. कित्तेक वृद्ध व महिला तासनतास बस ची वाट बगत बसतात. तसेच काही वृद्ध कारण नसताना रोजच्या रोज ग्रामीण भागातुन शहरात नको त्या गोष्टी साठी प्रवास करतात. पण याचा मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. आधीच ग्रामीण भागात बस चे प्रमाण कमी असताना होणाऱ्या गर्दी मुळे त्यांना त्याच गर्दीतून जनावरा सारखे कोंडून प्रवास करावा लागतो. कधी कधी तर गर्दी एवढी होते कि विद्यार्थ्यांनाच बस मध्ये चढायला जागा शिल्लक राहत नाही. त्यामुळे महाराष्ट्र शासनाची अर्ध सवलत व पूर्ण सवलत मोफत प्रवास ही योजना कुठे तरी डोके दुःखी ठरत आहे.






